Breaking News

शूर सैनिकांच्या गौरवार्थ पनवेलमध्ये भव्य तिरंगा यात्रा

’ऑपरेशन सिंदूर’मुळे प्रत्येक भारतीयाचे मस्तक अभिमानाने उंचावले- आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांना उद्ध्वस्त करून समाचार घेतला. त्या अनुषंगाने ऑपरेशन सिंदूर या लष्करी मोहिमेतील भारतीय सशस्त्र दलाच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने रविवारी (दि. 18) पनवेलमध्ये भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली.
या यात्रेची सुरुवात पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली, तर समारोप स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याला अभिवादन करून झाले. या मार्गक्रमणादरम्यान संपूर्ण पनवेल शहर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमले होते. हातात तिरंगा ध्वज, मनात राष्ट्राभिमान आणि भारत माता की जय, वंदे मातरम जयघोष घेऊन पनवेलकरांनी या यात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या यात्रेत पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर कविता चौतमोल, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीता पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, कामोठे मंडळ अध्यक्ष विकास घरत, कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील, तळोजा मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, उलवे मंडळ अध्यक्ष रूपेश धुमाळ, कर्नाळा मंडळ अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी नगरसेवक अनिल भगत, गणेश कडू, अजय बहिरा, संतोष शेट्टी, मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, तेजस कांडपिळे, बबन मुकादम, राजेंद्र शर्मा, अमित ओझे, रविनाथ पाटील, माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, राजेश्री वावेकर, वृषाली वाघमारे, सुशीला घरत, सुलोचना कल्याणकर, नलिनी शेलार, सारिका भगत, रूचिता लोंढे, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, विचुंबे सरपंच प्रमोद भिंगारकर, न्हावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, संजय भगत, मन्सूर पटेल, राजेश पाटील, योगेश लहाने, ब्रिजेश पटेल, केदार भगत, अमन अख्तर, सतीश पाटील, रुपेश नागवेकर, इर्शाद शेख, भीमराव पोवार, कृष्णा पाटील, स्वाती कोळी, सपना पाटील, समिना साठी, संध्या शारबिद्रे, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते युवकवर्ग, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक आणि परिणामकारक कारवाई करीत शत्रूला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. या मोहिमेमुळे देशाची सुरक्षा, सक्षमता आणि आक्रमकता यांचे वैशिष्ट्य अधिक ठळक झाले असून या ऐतिहासिक लष्करी कारवाईमुळे प्रत्येक भारतीयाचे मस्तक अभिमानाने उंचावले आहे. हा पराक्रम देशाच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असलेल्या जवानांचे आणि देशासाठी कठोर निर्णय घेणार्‍या नेतृत्वाचे प्रतीक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करीत असल्याचे सांगून आपल्या भाषणात राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला आणि देशसेवेच्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याला पूर्ण सूट दिली आणि सैन्याने पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली. पाकिस्तानने आपल्या देशावर हल्ले केले, पण आपल्या देशाच्या सैन्याने चोख उत्तर देत त्यांचे हल्ले परतवून लावत त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. आणि अखेर पाकिस्तानला आपल्या भारत देशापुढे शरणागती पत्करावी लागली. भारत देश हा संस्कृती आणि एकतेने नटलेला देश आहे. त्यामुळे भारतावर हल्ले करणार्‍यांना जशास तसे आणि कठोर उत्तर मिळेल, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी नमूद केले.
या तिरंगा यात्रेद्वारे पनवेलवासीयांनी आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम केला.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply