Breaking News

मंत्रिमंडळ खातेवाटपावर राष्ट्रवादीचा वरचष्मा, काँग्रेसची दुय्यम खात्यांवर बोळवण, शिवसेनेच्या वाट्यालाही आली यथातथा खाती

मुंबई : प्रतिनिधी

गेले अनेक दिवस सुरू असलेल्या घोळामुळे चर्चेत आलेले महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर झाले असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यास मान्यता दिली आहे.

या खातेवाटपात महत्त्वाची खाती आपल्याकडे वळविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आहे, तर काँग्रेस पक्षाची मात्र दुय्यम खात्यांवर बोळवण करण्यात आली आहे. तिसरीकडे शिवसेनेच्या वाट्यालाही कमी महत्त्वाची खाती आली आहेत. त्यामुळे कामकाज करताना वर्चस्ववादातून मंत्र्यांमध्ये खटके उडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आता ही मंडळी कसा कारभार करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 -मंत्रिनिहाय खातेवाटप :  मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे : सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेले विषय/खाती; उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार : वित्त, नियोजन; सुभाष राजाराम देसाई : उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा; अशोक शंकरराव चव्हाण : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून); छगन चंद्रकांत भुजबळ : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण; दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील : कामगार, राज्य उत्पादन शुल्क; जयंत राजाराम पाटील : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास; नवाब मोहम्मद इस्लाम मलिक : अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता; अनिल वसंतराव देशमुख : गृह; विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात : महसूल; राजेंद्र भास्करराव शिंगणे : अन्न व औषध प्रशासन; राजेश अंकुशराव टोपे : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण; हसन मियालाल मुश्रीफ : ग्रामविकास; डॉ. नितीन काशिनाथ राऊत : ऊर्जा; वर्षा एकनाथ गायकवाड : शालेय शिक्षण; डॉ. जितेंद्र सतिश आव्हाड : गृहनिर्माण; एकनाथ संभाजी शिंदे : नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम); सुनील छत्रपाल केदार : पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण; विजय वडेट्टीवार : इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप पुनर्वसन; अमित विलासराव देशमुख : वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य; उदय रवींद्र सामंत : उच्च व तंत्र शिक्षण; दादाजी दगडू भुसे : कृषी, माजी सैनिक कल्याण; संजय दुलिचंद राठोड : वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन; गुलाबराव रघुनाथ पाटील : पाणीपुरवठा व स्वच्छता; के. सी. पाडवी : आदिवासी विकास; संदिपानराव आसाराम भुमरे : रोजगार हमी, फलोत्पादन; बाळासाहेब उर्फ श्यामराव पांडुरंग पाटील : सहकार, पणन; अनिल दत्तात्रय परब : परिवहन, संसदीय कार्य; अस्लम रमजान अली शेख : वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास; यशोमती ठाकूर (सोनवने) : महिला व बालविकास; शंकराराव यशवंतराव गडाख : मृद व जलसंधारण; धनंजय पंडितराव मुंडे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य; आदित्य उद्धव ठाकरे : पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार. राज्यमंत्री-अब्दुल नबी सत्तार : महसूल, ग्रामविकास, बंदरे, खारजमिनी विकास, विशेष सहाय्य, सतेज उर्फ बंटी डी. पाटील : गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण, शंभुराज शिवाजीराव देसाई : गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन; ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार; दत्तात्रय विठोबा भरणे : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन; डॉ. विश्वजित पतंगराव कदम : सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ, मराठी भाषा; राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य; संजय बाबूराव बनसोडे : पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य; प्राजक्त प्रसादराव तनपुरे : नगर विकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन; आदिती सुनील तटकरे : उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क.

-13 जिल्हे मंत्र्यांविना महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 43 मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये 32 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्यमंत्र्यांचा सहभाग आहे. 43 मंत्रिपदे असतानाही राज्यातील 36 पैकी 13 जिल्ह्यांना एकही मंत्रिपद मिळाले नाही. राज्यात इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री (सुशीलकुमार शिंदे) आणि उपमुख्यमंत्री (विजयसिंह मोहिते-पाटील) पद भूषविणारा सोलापूर जिल्हा होता, मात्र हाच जिल्हा यंदाच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदापासून वंचित राहिलेला पाहायला मिळतोय. सोलापूरबरोबरच पालघर, उस्मानाबाद, अकोला, भंडारा, गोंदिया, वर्धा, परभणी, हिंगोली, वाशिम, गडचिरोली, धुळे व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मंत्रिपद मिळाले नाही.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply