Breaking News

Monthly Archives: June 2019

रायगडातील प्रकल्पांना गती वाहतूक आणि पायाभूत ; सुविधांना शासनाचे प्राधान्य

मुंबई : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात ट्रान्स हार्बर लिंक, कॉरिडॉर, नैना आदी प्रकल्प विकासाच्या दृष्टिकोनातून शासन गतीने राबवत आहे. वाहतूक आणि पायाभूत सुविधांना शासनाचे प्राधान्य असून, त्यासाठी आवश्यक तरतूद करण्यात येत आहे.  मुंबई शहर व महानगर प्रदेश क्षेत्राचा विकास आणि समस्यांच्या अनुषंगाने विधानसभेत उपस्थित नियम 293च्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री …

Read More »

जल संरक्षणासाठी सर्वांनी एकजूट व्हावे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील कोट्यवधी जनतेला विकास हवा आहे आणि त्यासाठीच त्यांनी मला सेवा करण्याची पुन्हा संधी दिली, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 30) आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिल्याच मन की बात कार्यक्रमात त्यांनी जल संरक्षणासाठी सर्वांनी एकजूट होण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी या …

Read More »

500 वारकर्यांची आरोग्य तपासणी ; कर्जत मेडिकल असोसिएशनकडून सुश्रुषा

कर्जत : बातमीदार आषाढी वारीमध्ये विठूरायाचा नामघोष करीत असंख्य वारकरी देहभान विसरून पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. या वारकर्‍यांची सेवा करण्याचा स्तुत्य उपक्रम कर्जत मेडिकल असोसिएशनने राबविला. असोसिएशनच्या सदस्यांनी वारीतील सुमारे 500 वारकर्‍यांची आरोग्य तपासणी करून भक्ती व बांधिलकीचे अनोखे दर्शन घडविले आहे. कर्जत मेडिकल असोसिएशनचे एक पथक अध्यक्ष डॉ. गणेश …

Read More »

अलिबाग, नागाव किनारे तेल तवंगाने काळवंडले

अलिबाग : प्रतिनिधी खवळलेल्या समुद्राच्या लाटांबरोबर तेलाचा तवंग मोठ्या प्रमाणावर किनार्‍यावर येत असल्याने सध्या अलिबाग व नागाव हे सुंदर किनारे काळवंडले आहेत. तेलामुळे किनारे चिकटही झाले असून, त्याचा त्रास पर्यटकांना सहन करावा लागतोय. तेल तवंगामुळे परिसर निसरडा होऊन लोक पाय घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. खोल समुद्रात मालवाहू जहाजे इंधन …

Read More »

…अन् मुरूडकरांचा जीव पडला भांड्यात

मुरूड : येथील समुद्रकिनारी लोखंडी व त्यावर वाहनांचे टायर लावलेली वस्तू वाहून आल्याने स्थानिक नागरिकांत घबराट पसरली होती. सरतेशेवटी तो बोटींना दिशा दर्शविण्यासाठी असलेला बोया असल्याचे स्पष्ट झाल्याने मुरूडकरांचा जीव भांड्यात पडला. मोठ्या आकाराची वस्तू समुद्रकिनारी आल्याने स्थानिक नागरिक व पर्यटकसुद्धा धास्तावले होते. याबाबत तत्काळ मुरूड पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी …

Read More »

उद्योजकांसाठी प्रदर्शन

पनवेल : अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद आणि पेडणेकर कुटुंबीय यांच्या वतीने समाजश्रेष्ठी जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त लघू व गृहउद्योग करणार्‍या उद्योजकांसाठी उत्पादनाचे प्रदर्शन, विक्री आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ नागरिक सभागृहात झालेल्या …

Read More »

काँग्रेस अध्यक्षपदी सुशीलकुमार शिंदेंची वर्णी?

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये अखेर नेतृत्वबदलाच्या हालचालींना वेग आला असून, गांधी घराण्यावर प्रचंड निष्ठा असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे राहुल गांधी यांचे उत्तराधिकारी असतील, अशी माहिती पुढे येत आहे. काँग्रेस पक्षाची धुरा कुणाच्या हाती द्यायची, यावर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी बराच खल केला. गांधी कुटुंबीयांशीही …

Read More »

पर्यटकांना खुणावतेय गाढेश्वर धरण

पनवेल : बातमीदार – पावसाचे दिवस असल्याने तालुक्यातील गाढेश्वर धरण परिसर पर्यटकांना खुणावत आहे. निसर्गाचे सान्निध्य, हिरवाई, चारही बाजूने डोंगरांच्या रांगा, त्यामध्ये धरणातून धबधब्यासारखे पडणारे पाणी यामुळे पर्यटक या धरणाकडे अधिक आकर्षित  होतात, मात्र मद्याच्या नशेत पाण्याचा अंदाज येत नसल्याने जीव गमावल्याच्या घटना दरवर्षी येथे घडत आहेत. त्यामुळे या वर्षी …

Read More »

रोटरी क्लब आणि इंडियन मेडिकल असोशिएशनचा उपक्रम कौतुकास्पद -संजय कुमार

पनवेल : वार्ताहर – पोलीस अधिकारी, कर्मचारी त्याचप्रमाणे त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व इंडियन मेडिकल असोशिएशनच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषधांचे वाटप हा उपक्रम राबविण्यात येत असून हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी आज पनवेल तालुका पोलीस ठाण्यात आयोजित …

Read More »

निरोगी जीवनासाठी योगा उपयुक्त -डॉ. हेमलता वैशंपायन

उरण : वार्ताहर – निरोगी जीवनासाठी योगा उपयुक्त असून योगामुळे ताणताणाव दूर होऊन मानसिक संतुलन कायम राखण्यासाठी मदत होते. त्यासाठी सर्वांनी नियमित योगासने करावीत. त्यामुळे आपले शरीर निरोगी होतेच त्याचप्रमाणे एकाग्रता वाढते. आहार व नियमित योगा हे महत्त्वाचे आहे. शारीरिक व मानसिक लाभ होतो. त्याचप्रमाणे महिलांनी आपल्या आहारात लक्ष ठेवले …

Read More »