Breaking News

अलिबागबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी आदित्य नारायणचा माफीनामा

मुंबई ः प्रतिनिधी
इंडियन आयडल-12 या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायणने नुकताच प्रसारित झालेल्या भागामध्ये अलिबागवरून वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्याच्यावर टीका सुरू झाली होती. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेने उडी घेतल्याने या वादाला गंभीर वळण लागले होते. एकूण या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आदित्य नारायण याने सोशल मीडियावरून माफीनामा प्रसिद्ध केला आहे.
इंडियन आयडल-12 कार्यक्रमाच्या अलिकडेच प्रसारित झालेल्या भागात आदित्यने एका स्पर्धकाचे गाणे संपल्यावर आदित्यने त्याला ’रागदारीचा नीट अभ्यास करून येत जा… आम्ही काय अलिबागवरून येथे आलो आहोत का?’ असे सुनावले. प्रेक्षकांना ही गोष्ट खूपच खटकली होती.

Check Also

उलवे नोड सी-फूड फेस्टिव्हलचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

उलवे नोड ः रामप्रहर वृत्तराज्यातील मत्स्य व्यवसायामध्ये मोठी क्षमता असून त्यासाठी बजेट वाढवून विकासाला गती …

Leave a Reply