Breaking News

झारखंडमध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 10 जण ठार

रांची : वृत्तसंस्था : झारखंडची राजधानी रांचीजवळ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका कुटुंबातील 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रांचीजवळच्या कुजू घाटात डम्पर आणि इनोव्हा कार यांच्यात हा अपघात झाला. रांचीच्या हटिया येथील रेल्वे कॉलनीमध्ये राहणारे सिंह कुटुंबीय बिहारच्या भोजपूर येथील एका मौजीबंधन कार्यक्रमाहून येत होते. या वेळी कुजू घाटात डम्परवर कार जाऊन आदळली. यामध्ये सत्यनारायण सिंह, मुलगा अजित सिंह, जावई मंटू सिंह आणि सुबोध सिंह, गाडीचे चालक विजय हे ठार झाले आहेत; तर कुटुंबातील दोन महिला आणि तीन मुलांचाही मृतांमध्ये समावेश आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply