Breaking News

झारखंडमध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 10 जण ठार

रांची : वृत्तसंस्था : झारखंडची राजधानी रांचीजवळ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका कुटुंबातील 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रांचीजवळच्या कुजू घाटात डम्पर आणि इनोव्हा कार यांच्यात हा अपघात झाला. रांचीच्या हटिया येथील रेल्वे कॉलनीमध्ये राहणारे सिंह कुटुंबीय बिहारच्या भोजपूर येथील एका मौजीबंधन कार्यक्रमाहून येत होते. या वेळी कुजू घाटात डम्परवर कार जाऊन आदळली. यामध्ये सत्यनारायण सिंह, मुलगा अजित सिंह, जावई मंटू सिंह आणि सुबोध सिंह, गाडीचे चालक विजय हे ठार झाले आहेत; तर कुटुंबातील दोन महिला आणि तीन मुलांचाही मृतांमध्ये समावेश आहे.

Check Also

‌‘स्वर संध्या‌’ कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध

पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply