मुंबई ः प्रतिनिधी
राज्यातील कोरोना आकडेवारीच्या सरासरीपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण संपूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. म्युकरमायकोसिस आणि करोना या दोन आजारांसंदर्भात मंगळवारी (दि. 25) झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले, जे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत त्या जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण 100 टक्के बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहेत. सर्व बाधितांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर्सची संख्या वाढवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यात सध्या सातारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, उस्मानाबाद, बीड, रायगड, पुणे, हिंगोली, अकोला, अमरावती, कोल्हापूर, ठाणे, सांगली, गडचिरोली, वर्धा, नाशिक, अहमदनगर, लातूर हे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत.
Check Also
Midi Bbb Company Profile Bbb
Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …
RamPrahar – The Panvel Daily Paper