महाड : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव येथे शनिवारी (दि. 26) मध्यरात्री बलेनो कारची बसला धडक बसून तिघांचा मृत्यू आणि दोन जण जखमी झाले आहेत.
मुंबईच्या दिशेने जाणार्या बलेनो कारने (एमएच 05-डीएस 6861) समोरून येणार्या बसला (एमएच 48-बीएम 6299) धडक दिली. या अपघातात कारमधील संदीप सीताराम पाटील (40, ठाणे) यांचा जागीच, तर अनिल दत्ताराम राणे (45) व साधना निलेश राऊत (45, मुंबई) यांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. कारचालक दीपक सीताराम पाटील व सुगंधा सीताराम पाटील (ठाणे) गंभीर जखमी झाले आहेत.
Check Also
ज्येष्ठ उद्योजक कान्हाशेठ ठाकूर यांचे निधन
पनवेल : रामप्रहर वृत्तज्येष्ठ उद्योजक कान्हाशेठ ठाकूर यांचे बुधवारी (दि.३) वयाच्या ७२व्या वर्षी अल्पशा आजाराने …
RamPrahar – The Panvel Daily Paper