महाड : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव येथे शनिवारी (दि. 26) मध्यरात्री बलेनो कारची बसला धडक बसून तिघांचा मृत्यू आणि दोन जण जखमी झाले आहेत.
मुंबईच्या दिशेने जाणार्या बलेनो कारने (एमएच 05-डीएस 6861) समोरून येणार्या बसला (एमएच 48-बीएम 6299) धडक दिली. या अपघातात कारमधील संदीप सीताराम पाटील (40, ठाणे) यांचा जागीच, तर अनिल दत्ताराम राणे (45) व साधना निलेश राऊत (45, मुंबई) यांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. कारचालक दीपक सीताराम पाटील व सुगंधा सीताराम पाटील (ठाणे) गंभीर जखमी झाले आहेत.
Check Also
पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्या प्रयोगशाळांवर कारवाई करणार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्या …