महाड : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव येथे शनिवारी (दि. 26) मध्यरात्री बलेनो कारची बसला धडक बसून तिघांचा मृत्यू आणि दोन जण जखमी झाले आहेत.
मुंबईच्या दिशेने जाणार्या बलेनो कारने (एमएच 05-डीएस 6861) समोरून येणार्या बसला (एमएच 48-बीएम 6299) धडक दिली. या अपघातात कारमधील संदीप सीताराम पाटील (40, ठाणे) यांचा जागीच, तर अनिल दत्ताराम राणे (45) व साधना निलेश राऊत (45, मुंबई) यांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. कारचालक दीपक सीताराम पाटील व सुगंधा सीताराम पाटील (ठाणे) गंभीर जखमी झाले आहेत.
Check Also
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर
खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …
RamPrahar – The Panvel Daily Paper