-शैलेश पालकर
देशातील सुमारे 65 टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बर्याच अन्नघटकांचा पुरवठा हा भातातून होत असतो.तसेच इतर पिकांच्या तुलनेत पशु-पक्ष्यांचे खाद्य व औदयोगिकदृष्ट्यादेखील भाताचे अनेक उपयोग होतात. त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते.हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी सहाय्यक ठरणार्या विशेषत: सुधारित भात जातीच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ शिफारसीनुसार सेंद्रिय व रासायनिक खताचा संतुलित वापर मशागतीचे व लावणीचे व योग्य तंत्रज्ञान पीक संरक्षण उपायांचा अवलंब इ. बाबींवर विशेष भर द्यावा लागणार आहे.तसेच संकरित भात निर्मितीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. आपल्या राज्यात खरीप व उन्हाळी हंगामात भाताची लागवड केली जाते.
भात उत्पादनातील समस्या
राज्यातील शेतकरी भात शेती अनेक वर्षापासून करत आहेत. तरीसुध्दा देशाच्या सरासरी उत्पादकतेशी तुलना करता राज्याची उत्पादकता कमी असून त्यास वरील कारणे आहेत. राज्यातील भात उत्पादनातील महत्त्वाच्या समस्या कोणत्या आहेत याविषयी माहिती खाली देण्यात आली आहे.
1. सुधारित व अधिक उत्पादन देणार्या भात जातीच्या लागवडीखाली असलेले कमी क्षेत्र.
2. सेंद्रिय व रासायनिक खतांचा कमी आणि असंतुलित वापर.
3. किड रोग व तण नियंत्रण उपायांचा अल्प प्रमाणात वापर.
4. वेळेवर व पुरेशा प्रमाणात शेतमजुरांच्या उपलब्धतेतील
अडचणीमुळे रोपे लावणी करताना लागणारा अधिक कालावधी.
5. राज्यातील भात शेती करणारे सुमारे 80 ते 85 टक्के अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि त्यांची विखुरलेली भातशेती यामुळे यांत्रिकीकरणाचा कमी प्रमाणात वापर
6. समुद्रकिनार्यालगतच्या खार जमिनीत अनियमित व अपुर्या अथवा जादा पावसामुळे होणारे नुकसान
7. वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पोहोचण्यासाठी खत पुरवठ्यातील अडचणी व लागणारा विलंब.
8. सुधारित भात लागवडीच्या तंत्रज्ञानाचा शेतकर्यापर्यंत होणारा अल्प प्रमाणातील प्रचार.
9. अति बारीक लांब दाण्याची व सुवासिक भात जाती भरडण्यासाठी लागणार्या सुधारित भात गिरण्यांची लागवड क्षेत्रातील अपुरी उपलब्धता.
भात लागवड पदधत
1) पुर्वमशागत-पहिल्या पिकाच्या कापणीनंतर योग्य वापसा येताच पहिली नांगरट करावी.पाऊस पडल्यावर पुन्हा आडवी नांगरट करावी.आणि दुस-या नांगरटीद्वारे हेक्टरी 7.5 टनकंपोष्ट खत एकसारखे मिसळावे.चिखलणीच्यावेळी हेक्टरी 5 टन गिरीपुष्प (हिरवळीचे खत) शेतात मिसळावे.यामुळे 50 टक्के नत्र खताची बचत होते.
2) बीजप्रक्रिया-बियाणे पेरणीपुर्वी प्रथम मिठाच्या 3 टक्के द्रावणात बुडवुन घ्यावे. जे बियाणे पाण्यावर तरंगते ते हलके व खराब असल्याने वेगळे करावे. आणि तळाशी असणारे बियाणे लगेच पाण्यातुन काढुन स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत सुकवावे.त्यानंतर प्रति किलो बियाण्यास 2.5 ग—ॅम प्रमाणे थायरम हे बुरशीनाशक चोळावे.व नंतर बियाणे पेरणीसाठी वापरावे.
3) भात पेरणीसाठी विविध सुधारित पदधती-1) ड्रम सिडर 2) रहु पदधत 3)टोकण पदधत 4) चारसुत्री पदधत 5)सगुणा भात तंत्रज्ञान 6) पटटा पदधत
4) रोपवाटिकेचे व्यवस्थापन-
जमिनीचा उतार लक्षात घेऊन उंच निच-याच्या जागी तळाशी 120 सेंमी व पृष्ठभागी 90 सेंमी रुंदीचे 8 ते 10 सेंमी.उंचीचे उतारानुसार योग्य त्या लांबीचे गादी वाफे तयार करावेत.वाफयांना प्रति गुंठा क्षेत्रास 1 किग—ॅ. युरिया आणि 3 किग—ॅ सिंगल सुपर फॅास्फेट दयावे.
5) लावणी(पुनर्लागण)-खरीप हंगामात 12 ते 15 सेंमी उंचीची 5 ते 6 पाने फुटलेली जातीच्या पक्वता कालावधीनुसार 20 ते 27 दिवसांची रोपे लावणीसाठी वापरावीत.रब्बी हंगामात पेरणीनंतर 35 ते 40 दिवसांची रोपे लावावीत.एस.आर.टी.पदधतीच्या तत्वानुसार आपल्या विभागात 15 दिवसांच्या रोपांची लावणी पाणी कमी साठणा-या क्षेत्रात केल्यास पुनर्ला्गवड वेळेत आटोपते.व उत्पादकतेत भरीव वाढ होते.लावणी सरळ आणि उथळ(2.5 ते 3.5 सेंमी खोल) करावी.उथळ लावणी केल्याने फुटवे चांगले येतात.एका चुडात 3 रोपे लावावीत.संकरित भातासाठी एका चुडात एकच रोप लावावे.
6) खताचे व्यवस्थापन-भातास हेक्टरी 100 किलो नत्र 50 किलो
स्फुरद आणि 50 किलो पालाश दयावे.(100:50:50)
1. चिखलणीच्या वेळी 40:50:50
2. फुटवे येण्याच्या वेळी 40 किलो नत्र (लावणीनंतर 30 ते 40 दिवसांनी)
3. पीक फुलो-यात असताना 20 किलो नत्र (लावणीनंतर 60 ते 70 दिवसांनी)
5-आंतरमशागत व पाण्याचे नियोजन-पाणी निचरणार्या शेतात तणांचा उपद्रव कमी करण्यासाठी ब्यटॅक्लोर तणनाशकाचा हेक्टरी 1.5 किलो क्रियाशील घटक 600 लीटर पाण्यात द्रावण पाठीवरील नॅपसॅक पंपाद्वारे लावणीनंतर 4 दिवसांनी मागे चालत येत फवारावे.
लावणीनंतर पहिल्या 30 दिवसांपर्यंत शेतात पाण्याची पातळी 2.5 ते 5 सेंमी ठेवावी. म्हणजे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. लोंब्या येण्यापुर्वी 10 दिवस व आल्यानंतर 10 दिवसापर्यंत शेतातील पाणी पातळी
10 सेंमी ठेवावी. दाणे भरेपर्यंत पाण्याची पातळी 5 सेंमी ठेवावी. त्यानंतर कापणीपुर्वी 8 ते 10 दिवस शेतातील पाणी काढुन टाकावे.
6-कापणी-सुमारे 90 टक्के दाणे पिकल्यावर व रोपे हिरवट असतानाच वैभव विळयाने जमिनीलगत कापणी करावी. मळणी नंतर 2 ते 3 उन्हे देऊन धान्य वाळवावे.
कापणी उशिरा केल्यास लोंबीच्या टोकाचे भरलेले दाणे शेतात गळुन पडतात. भात कांडपाचे वेळी कणीचे प्रमाण वाढते. पेंढयाची प्रत खालावते आणि पेंढा कमी मिळतो म्हणुन पिकाची कापणी वेळेतच करावी.
भाताच्या सुधारित जाती
जात कालावधी दिवस दाण्याचा प्रकार वैशिष्ट्ये उत्पन्न (क्विंहे.)
रत्नागिरी-73 95 ते 100 दिवस लांब, जाड, हळवा 35-40
कर्जत-184 100 ते 105 दिवस लांब, बारीक, हळवा 30-35
कर्जत-1 110 ते 115 दिवस लांब, बारीक, निमगरवा 35-40
रत्नागिरी-24 105 ते 110 दिवस लांब, बारीक, निमगरवा 35-40
कर्जत-3 115 ते 120 दिवस लांब, बारीक निमगरवा 45-50
कर्जत-2 140 ते 145 दिवस लांब, बारीक, गरवा 40-45
कर्जत-4 110 ते 115 दिवस आखूड, अतिबारीक, 30-35
निमगरवा
कर्जत-5 125 ते 130 दिवस लांब, जाड, निमगरवा 40-45
कर्जत-6 135 ते 140 दिवस आखूड, बारीक, गरवा 35-40
कर्जत-7 115 ते 120 दिवस लांब, बारीक, निमगरवा 45-50
कर्जत-8 140 ते 145 दिवस आखूड, बारीक, गरवा 35-40
कर्जत-9 120 ते 125 दिवस मध्यम, बारीक, निमगरवा 45-50
कर्जत-10 140 ते 145 दिवस लांब, बारीक, गरवा 50-52
पनवेल-1 125 ते 130 दिवस आखूड, जाड, निमगरवा 35-40
क्षार प्रतिकारक
पनवेल-2 110 ते 115 दिवस लांब, बारीक, निमगरवा 35-40
क्षार प्रतिकारक
पनवेल-3 120 ते 125 दिवस लांब, जाड, निमगरवा 45-50
क्षार प्रतिकारक
जया 125 ते 130 दिवस लांब, जाड, निमगरवा 55-60
रत्नागिरी-6 120 ते 125 दिवस मध्यम, बारीक, निमगरवा 40-45
रत्नागिरी-7 110 ते 125 दिवस आखूड, जाड,लाल तांदूळ 45-50
रत्नागिरी-8 135 ते 138 दिवस मध्यम, बारीक, सुवर्णा 50-55 जातीला पर्याय