Breaking News

चक्रीवादळामुळे 20 घरांचे नुकसान

अलिबाग ः प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील गोंधळपाडा गावात चक्रीवादळामुळे सुमारे 20 घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने येथील नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त ग्रामस्थांकडून होत आहे.बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्याला चांगला फटका बसला आहे. तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील गोंधळपाडा गावात प्राथमिक अंदाजानुसार 15 ते 20 घरांचे प्रचंड नुकसान झाले. वार्‍यामुळे छप्पर, पत्रे उडाले. काही ठिकाणी चिंच, आंबा आदी झाडे पडल्याने घरांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, अलिबाग तालुक्यातील इतर लहान-मोठ्या गावांनाही निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसून अतोनात नुकसान झाले आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply