Breaking News

कोलकाता, बिहारच्या ’लिची’चा गोडवा नवी मुंबईकर चाखणार

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोलकाता आणि बिहारच्या लिचीचा गोडवा आता नवी मुंबईकरांना चाखायला मिळणार आहे. कारण नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये लिचीची आवक सुरू झाली आहे.

वाशीतील फळबाजारात 5 ते 9 हजार किलो इतकी लिचीची आवक झाली आहे. दहा किलोच्या लिचीच्या एका पेटीला 1500 ते 2 हजारांपर्यंत भाव मिळतोय. त्वचा सुंदर बनवण्यास मदत करणार्‍या आणि वजन घटवणार्‍या लिचीची मागणी वाढू लागली आहे. एकुणच येत्या काळात लिचीची आवक वाढल्यास लिचीचा दर कमी होण्याची शक्यता आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply