Breaking News

कोलकाता, बिहारच्या ’लिची’चा गोडवा नवी मुंबईकर चाखणार

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोलकाता आणि बिहारच्या लिचीचा गोडवा आता नवी मुंबईकरांना चाखायला मिळणार आहे. कारण नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये लिचीची आवक सुरू झाली आहे.

वाशीतील फळबाजारात 5 ते 9 हजार किलो इतकी लिचीची आवक झाली आहे. दहा किलोच्या लिचीच्या एका पेटीला 1500 ते 2 हजारांपर्यंत भाव मिळतोय. त्वचा सुंदर बनवण्यास मदत करणार्‍या आणि वजन घटवणार्‍या लिचीची मागणी वाढू लागली आहे. एकुणच येत्या काळात लिचीची आवक वाढल्यास लिचीचा दर कमी होण्याची शक्यता आहे.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply