Breaking News

नवी मुंबईत तांदूळ व आंबा महोत्सव

नवी मुंबई : बातमीदार

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान -उमेदच्या राज्यभरातील स्वयंसहाय्यता गटांच्या शेतातील उत्पादनाच्या आधारित तांदूळ आणि आंबा महोत्सव 20, 21 आणि 22  मे रोजी पुणे विद्यार्थी गृहचे विद्याभवन शैक्षणिक संकुल (सेक्टर-18, नेरूळ) येथे आयोजित केला आहे.

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांच्या शेतातील तांदुळाच्याच्या विविध जाती, सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला हापूस, केशर, पायरी इत्यादी प्रकारचा आंबा या महोत्सवात उपलब्ध असेल. या महोत्सवामध्ये इंद्रायणी हातसडीचा, इंद्रायणी पॉलिश, दप्तरी, जय श्रीराम, सेंद्रिय ब्लॅक, वाईसार, खुशबू, चिमण साळ, भवाळ्या जिरेसाल या प्रकारच्या जातींचा तांदूळ या महोत्सवामध्ये प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. त्याचसोबत अवळाची उत्पादने, विविधप्रकारचे पापड, विविध मसाले, रोस्टेड गहू, नाचणी चे खाद्य पदार्थ, बांबूपासून तयार केलेल्या कलाकृती यासारख्या अनेक गोष्टी या महोत्सवात प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 20) सकाळी 12 वाजता अभियानाचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयचे कोकण विभागाचे उपसंचालक गणेश मुळे, पुणे विद्यार्थी गृहचे संचालक दिनेश मिसाळ, स्माइल फाउंडेशनच्या  उमा धीरज आहुजा आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील नागरिकांनी या महोत्सवाला उपस्थिती देऊन दर्जेदार व शुद्ध उत्पादने खरेदी करून ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनाला हातभार लावण्याचे आवाहन अभियानाच्या उपसंचालक शीतल कदम यांनी केले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply