Breaking News

कोलकाता, बिहारच्या ’लिची’चा गोडवा नवी मुंबईकर चाखणार

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोलकाता आणि बिहारच्या लिचीचा गोडवा आता नवी मुंबईकरांना चाखायला मिळणार आहे. कारण नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये लिचीची आवक सुरू झाली आहे.

वाशीतील फळबाजारात 5 ते 9 हजार किलो इतकी लिचीची आवक झाली आहे. दहा किलोच्या लिचीच्या एका पेटीला 1500 ते 2 हजारांपर्यंत भाव मिळतोय. त्वचा सुंदर बनवण्यास मदत करणार्‍या आणि वजन घटवणार्‍या लिचीची मागणी वाढू लागली आहे. एकुणच येत्या काळात लिचीची आवक वाढल्यास लिचीचा दर कमी होण्याची शक्यता आहे.

Check Also

‌‘एसआयआर‌’च्या उरण विधानसभा प्रमुखपदी डॉ. अविनाश गाताडे

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्रात सुरू होणाऱ्या मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानासाठी भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशतर्फे …

Leave a Reply