Breaking News

कोलकाता, बिहारच्या ’लिची’चा गोडवा नवी मुंबईकर चाखणार

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोलकाता आणि बिहारच्या लिचीचा गोडवा आता नवी मुंबईकरांना चाखायला मिळणार आहे. कारण नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये लिचीची आवक सुरू झाली आहे.

वाशीतील फळबाजारात 5 ते 9 हजार किलो इतकी लिचीची आवक झाली आहे. दहा किलोच्या लिचीच्या एका पेटीला 1500 ते 2 हजारांपर्यंत भाव मिळतोय. त्वचा सुंदर बनवण्यास मदत करणार्‍या आणि वजन घटवणार्‍या लिचीची मागणी वाढू लागली आहे. एकुणच येत्या काळात लिचीची आवक वाढल्यास लिचीचा दर कमी होण्याची शक्यता आहे.

Check Also

पनवेलमध्ये भाजप महिला मोर्चातर्फे नारीशक्ती उत्सव

महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष महिला मोर्चा पनवेल शहर मंडळाच्या वतीने …

Leave a Reply