Breaking News

योग्य आहाराने टाळा हृदयरोग

हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी पौष्टिक आहार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. चांगली जीवनशैली व आहार उच्च रक्तदाब, रक्तातील कोलेस्ट्रॉलचे वाढते प्रमाण, लठ्ठपणा यांसारखे आजार टाळण्यास मदत करू शकतात. हे सर्व घटक हृदयरोग होण्यासाठी कारणीभूत ठरतात. जगभरात व आपल्या देशातही वाढते शहरीकरण, आर्थिक प्रगती, कामामुळे व फिरण्यासाठी वाढलेला प्रवास, बाहेरचे खाणे ही सर्व वाढत्या आजारांची कारणे आहेत.

जेवणाची खालावलेली गुणवत्ता, पोषकतत्त्वे नसलेले साखर व मीठ जास्त असलेले पदार्थ नेहमी खाणे, मैदा व मैद्याच्या पदार्थांचा जास्त प्रमाणात आहारात समावेश, बाजारातील पॅकेटबंद खाण्याच्या पदार्थांचा रोज वापर इत्यादी गोष्टी आजकाल सगळ्यांच्या जीवनशैलीचा भाग बनले आहे. या सर्व सवयींचा परिणाम आरोग्यावर होतो. यामुळे सर्व आजारांना निमंत्रण मिळते व त्यात हृदयरोग, लठ्ठपणा व मधुमेह हे प्रामुख्याने लक्षणीय प्रमाणात वाढले आहेत.

फळे व भाज्या- फळे व भाज्या या अन्नगटातून आपल्याला भरपूर व्हिटॅमिन व मिनरल्स मिळतात. या अन्नगटाचा खूप मोठा फायदा म्हणजे यातून भरपूर तंतुमय पदार्थ शरीराला मिळतात. ही पोषकतत्त्वे हृदयरोगाचा धोका टाळण्यासाठी महत्त्वाची आहेत. जर सगळ्यांनी रोज एक-दोन फळे खाल्ली व कच्च्या भाज्यांचे एक वाटी सलाड शिजवलेल्या व्यतिरिक्त खाल्ले तर खूप फायदा होईल.

धान्ये- वेगवेगळी सर्व प्रकारची धान्ये जी आपल्याकडे मिळतात त्या सर्वांचा आहारात समावेश असावा. धान्यांचे पीठ बनवताना जाडसर दळावे. मैद्यासारखे बारीक पीठ वापरू नये. जेवढा पिठात कोंडा असेल तेवढे चांगले. आजकालचे काही नवीन पदार्थ करताना ब्रेड वापरला जातो. तोदेखील गव्हाचा किंवा मल्टीग्रेन वापरावा. नेहमी पास्ता खाणार्‍यांनी मैद्याचा पास्ता न खाता गव्हाचा पास्ता खावा. रोज भात खाणार्‍यांनी हातसडीचा तांदूळ किंवा ब्राऊन राईस घेणे चांगले.

प्रोटिन- आहारात प्रोटिनचा योग्य प्रमाणात समावेश करणेही हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. डाळी, कडधान्ये, सुकामेवा, अंडी, मासे आदी प्रमाणात घ्यावे. मटन किंवा मांसाहारी पदार्थातील लिवर, किडनी असे भाग टाळावेत. आहारात सोयाबीनचाही उपयोग करता येईल, तसेच दूध व दुधाचे पदार्थ जसे दही किंवा पनीर तयार करताना साय काढून केल्यास उत्तम.

तेल, तूप- हृदयरोगात रक्तवाहिनीत चरबी साठून रक्त प्रवाहास अडथळा निर्माण झाल्यास हार्ट अ‍ॅटॅक येऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी योग्य प्रमाणातच आहारात तेल व तुपाचा समावेश करावा. आपल्या एकूण कॅलरीजच्या गरजेपैकी साधारणत: 20 टक्के स्निग्ध पदार्थातून म्हणजे तेल व तुपातून आल्या पाहिजेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply