मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा चाललेला गलथान कारभार व त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश व नोकरभरतीबाबत नुकसान होत असल्याने मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर आक्रोश व्यक्त करण्यासाठी, आरक्षण व इतर मागण्यांची सद्यस्थिती यावर चर्चा करण्यासाठी आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा क्रांती महामुंबईतर्फे रविवारी (दि. 1) संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही संघर्ष यात्रा ही सकाळी लालबागपासून सुरू होणार असून व तिची सांगता संध्याकाळी ठाणे येथे होईल. दुसरीकडे ओबीसींकडून 3 नोव्हेंबरपासून राज्यभरात ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यभरातील सर्व तहसीलदार कार्यालयांना निवेदनदेखील दिले जाणार आहे.
Check Also
चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ -मुख्यमंत्री फडणवीस
रायगड : प्रतिनिधीमहाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र …
RamPrahar – The Panvel Daily Paper