Breaking News

अलिबाग, नागाव किनारे तेल तवंगाने काळवंडले

अलिबाग : प्रतिनिधी

खवळलेल्या समुद्राच्या लाटांबरोबर तेलाचा तवंग मोठ्या प्रमाणावर किनार्‍यावर येत असल्याने सध्या अलिबाग व नागाव हे सुंदर किनारे काळवंडले आहेत. तेलामुळे किनारे चिकटही झाले असून, त्याचा त्रास पर्यटकांना सहन करावा लागतोय. तेल तवंगामुळे परिसर निसरडा होऊन लोक पाय घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

खोल समुद्रात मालवाहू जहाजे इंधन तेल सोडतात. हे तेल लाटांबरोबर किनार्‍यावर येते व वाळूत मिसळते. त्याचे गोळे तयार झाल्याने सध्या अलिबाग किनार्‍यावरून चालणे मुश्कील बनले आहे. इतर कचराही किनार्‍यावर आला आहे. याबद्दल स्थानिकांबरोबरच पर्यटकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. तेलाचा तवंग व कचरा दूर करून किनारे स्वच्छ करावेत, अशी मागणी होत आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply