अलिबाग ः प्रतिनिधी
अलिबागची चार वर्षीय बाल गिर्यारोहक शर्विका जितेन म्हात्रे हिच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. तिने गुजरातमधील सर्वात उंच गिरनार शिखर सर केले असून अशी कामगिरी करणारी ती भारतातील पहिली कन्या ठरली आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 3500 फूट उंचीवर वसलेल्या गिरनारच्या गुरुशिखर या सर्वोच्च स्थानी पोहचण्यासाठी पायथ्यापासून सुमारे 10 हजार पायर्यांचा टप्पा पार करावा लागतो. शर्विकाने सुमारे साडेपाच तासांनंतर गिरनार शिखरावर महाराष्ट्राचा स्वराज्य ध्वज आणि भारताचा राष्ट्रध्वज फडकावला. तिच्या या मोहिमेची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे.