धाटाव : प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील तिसे रेल्वे फाटकावरील गेटमन चंद्रकांत कांबळे यांची 21 ऑगस्ट रोजी अज्ञात इसमाने गोळी झाडून हत्या केली होती. घर विक्रीच्या वादातून विजय रमेश शेट्टी याने ही हत्या केल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
मयत चंद्रकांत कांबळे यांची बहीण विमल शेट्टी व तिचा पती विजय शेट्टी या दोघांच्या नावे असलेले खैरवाडी येथील घर विजयला विकायचे होते. त्यामुळे दोघांमध्ये प्रचंड वाद निर्माण झाला असता पोलिसांनी विजयच्या घराची तपासणी करून मिळालेल्या पुराव्यानुसार मयत चंद्रकांत कांबळेंची हत्या विजयने केल्याचे निष्पन्न झाले आहे. विजयवर याआधीही गुन्हे दाखल आहेत.
Check Also
रिटघर येथे लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सवी वर्ष शुभचिंतन समारंभ उत्साहात
विद्यालयासाठी ४० लाखांची घोषणा पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, थोर देणगीदार, …
RamPrahar – The Panvel Daily Paper