धरमशाला : वृत्तसंस्था
भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (दि. 12)धरमशाला येथे होणार होता, मात्र सतत पडणार्या पावसामुळे अखेर एकही चेंडू न खेळता हा सामना रद्द करण्यात आला.
धरमशाला येथे दुपारी 1.30 वाजता सामना सुरू होणार होता, पण पाऊस आणि ओली खेळपट्टी यामुळे सामन्याची नाणेफेकही होऊ शकली नाही. आधी ओली खेळपट्टी आणि 2.30 नंतर पाऊस अशा दुहेरी कारणामुळे अखेर 5.30च्या सुमारास सामना रद्द करण्याचा निर्णय सामनाधिकार्यांनी घेतला.
गेल्या वर्षा याच मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता.
Check Also
उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper