नवी दिल्ली : अमेरिका, इटली, फ्रान्स, जर्मनी या देशांच्या तुलनेत भारताने कोरोनच्या लढाईत विजय मिळवला आहे. राष्ट्रीय महामार्ग हळूहळू सुरू झाले आहेत. बंदरे सुरू झाली आहेत. फॅक्ट्रींमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत आपण बरेच नियंत्रण मिळवू आणि पुढे जाऊ, असे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. कोरोनाविरुद्धचीच नाही तर त्यापुढे येणारी आर्थिक लढाईही आपण लढत आहोत. त्या लढाईतही आपण जिंकू, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, भारतात विकासाचे चक्र पुन्हा गती घेईल. आपण सगळे मिळून आर्थिक संकटही परतवून लावू. देश संकटात असताना आम्ही सगळे एक आहोत ही भावना अत्यंत महत्त्वाची आहे.
Check Also
‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम
दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …
RamPrahar – The Panvel Daily Paper