अलिबाग ः प्रतिनिधी
गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. 16 टन व त्यापेक्षा अधिक वजनाच्या वाहनांसाठी ही बंदी असेल. 18 ऑगस्टला रात्री 12 वाजल्यापासून 22 ऑगस्टपर्यंत, तसेच 28 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 29 ऑगस्टपर्यंत ही बंदी लागू असेल.
या कालावधीत रेती, वाळू किंवा त्यासारख्या गौण खनिजांच्या वाहतुकीलाही पूर्णपणे बंदी असणार आहे.
Check Also
उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper