नवी दिल्ली : भारतातील कोरोनाच्या साथीचा आलेख आता हळूहळू ढासळण्यास सुरुवात होईल आणि कोरोनाचे संकट फेब्रुवारी 2021पर्यंत आटोक्यात येईल, असा दावा सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीने केला आहे. देशात कोरोनाच्या केसेस एक कोटी सहा लाखांपेक्षा जास्त वाढणार नाहीत, असेही या समितीने म्हटले आहे. सध्याच्या घडीला भारतात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 75 लाखांपेक्षा जास्त असून, त्यापैकी 65 लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मोदी सरकारने मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन लागू केला नसता, तर देशभरात कोरोनामुळे 25 लाख लोकांचे प्राण गेले असते. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत झाली, असे निरीक्षण या समितीने नोंदविले आहे.
Check Also
सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी
तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …
RamPrahar – The Panvel Daily Paper