Breaking News

मराठा आंदोलकांची पोलिसांकडून नाकाबंदी

रसायनी : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 14) मराठा समाज बांधव व भगिनी मुंबईतील आझाद मैदानावर एकत्र येऊन आरक्षणासाठी पुढील दिशा ठरविणार आहेत. त्यामुळे पोलिसांकडून मराठा समाज आंदोलकांची नाकाबंदी करण्यात येत आहे. रविवारी (दि. 13) विविध मार्गांवर पोलीस प्रत्येक गाडीची पाहणी करताना दिसून आले. दरम्यान, स्थानिक पोलिसांच्या मदतीने मराठा समाजाच्या नेत्यांच्या गाडीचे क्रमांक घेऊन त्या गाड्या अडविण्यात आल्याचा आरोप खोपोलीतील मराठा समाज नेते सुनील पाटील यांनी केला, तर काही कार्यकर्ते गनिमी कावा करून आझाद मैदानात पोहचले असल्याचे रायगड जिल्हा समन्वयक विनोद साबळे यांनी भ्रमणध्वनीवर बोलताना सांगितले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply