मुंबई ः प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे लसीकरणासाठी जनतेला नाहक त्रास भोगावा लागत आहे. राज्य सरकारच्या गलथानपणामुळे कोरोना लसीचे पाच लाख डोस वाया गेले आहेत. त्यास जबाबदार कोण, असा सवाल करीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे.
राज्य सरकारने केंद्र सरकारवर आरोप करून राजकारण करू नये. महाराष्ट्रात अद्याप 23 लाख कोरोना लसीचे डोस शिल्लक आहेत. त्यांचा योग्य वापर करावा. तोपर्यंत केंद्र सरकार आणखी डोसचा पुरवठा लवकरच करणार आहे. महाराष्ट्राला लागेल तेवढी लस केंद्र सरकार देणार आहे. लसीचा तुटवडा जाणवणार नाही, असे आठवले म्हणाले.
Check Also
उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम
भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …
RamPrahar – The Panvel Daily Paper