माणगाव : प्रतिनिधी
पुणे कोथरूड परिसरातून रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरकडे पर्यटनासाठी निघालेल्या कर्मचार्यांची खासगी ट्रॅव्हल बस शनिवारी (दि.31) सकाळी ताम्हिणी घाटात माणगाव तालुक्यातील कोंडेथर गावच्या हद्दीत उलटली. या भीषण अपघातात दोन व्यक्ती जागीच ठार, तर 55 प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन्ही महिलांचा समावेश आहे.
अपघातग्रस्त बसमधून 57 प्रवासी प्रवास करीत होते. यातील सुरभी रवींद्र मोरे (वय 23) आणि कांजन मारुती मांजरे (वय 20) या दोघींचा जागीच मृत्यू झाला; तर उर्वरित 32 पुरुष व 23 महिला असे एकूण 55 पर्यटक प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील व पथक घटनास्थळी पोहचले. पोलीस, रेस्क्यू टीम, या मार्गावरील प्रवासी, परिसरातील ग्रामस्थ यांनी अपघातग्रस्त बसमधील जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.
Check Also
राम तेरी गंगा मैली @४१ वर्षे; राज कपूरच्या दिग्दर्शनातील शेवटचा चित्रपट
चित्रपटाच्या नावात त्याचं व्यक्तिमत्त्व अथवा ओळख व्हायला हवी. त्यातही दिग्दर्शक दिसतो. राज कपूरच्या दिग्दर्शनातील चित्रपटाचे …
RamPrahar – The Panvel Daily Paper