Breaking News

दहशतवादी हल्ल्याची भीती; काश्मीरमध्ये सैन्य वाढविले

नवी दिल्ली ः पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काश्मीर खोर्‍यात लपलेल्या दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा एक गट मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे लष्कराच्या 100 अतिरिक्त तुकड्या काश्मीर खोर्‍यात तैनात करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल जम्मू-काश्मीर दौर्‍यावरून परतल्यानंतर लष्कराच्या 100 अतिरिक्त तुकड्या म्हणजे 10 हजार भारतीय जवान तैनात केले आहेत. राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी डोवाल यांनी ज्येष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली. (संबंधित वृत्त पान 2 वर..)

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply