Breaking News

महाडमध्ये शिरले पुराचे पाणी; नागरिक धास्तावले

महाड : गेले काही दिवस सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दक्षिण रायगडातील महाड, पोलादपूर, माणगाव, तळा या तालुक्यांतील जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. विशेषकरून महाडला मंगळवारी (दि. 6) पुराचा मोठा फटका बसला. सावित्री, काळ, गांधारी या नद्यांनी महाड शहरात प्रवेश केल्याने बाजारपेठेसह अन्य भागांत पाणी शिरले. दस्तुरी नाका, रायगड मार्ग, दादली पूलही पाण्याखाली गेला होता. त्याचप्रमाणे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली. दरम्यान, महाडमधील वीजपुरवठा खंडीत झाला होता, तसेच फोनसेवाही ठप्प झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. रात्री एनडीआरएफचे (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) पथक दाखल झाले आणि त्यांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्याचे कार्य हाती घेतले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply