Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या अर्जावरचे सर्व आक्षेप फेटाळले

नागपूर : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्जावरचे सगळे आक्षेप फेटाळण्यात आले आहेत. निवडणूक अधिकार्‍यांनी हा निर्णय घेतला आहे. देवेंद्र गंगाधर फडणवीस यांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्राच्या छाननीच्या वेळी डॉ. आशिष देशमुख, प्रशांत पवार आणि इतर उमेदवार यांनी याबाबत हरकत उपस्थित केली. ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नामनिर्देशन पत्रामध्ये दाखल केलेल्या नमुना 26 मधील प्रतिज्ञापत्र हे नोटरी समक्ष सादर केले आहे. त्याची मुदत 28 डिसेंबर 2018 रोजी संपली असल्याचं नमूद करण्यात आलं आहे, तसेच प्रतिज्ञापत्राच्या सीलवर 28 डिसेंबर 2018 ही तारीख आहे. तर नोटरीच्या आडव्या शिक्क्यावर 3 ऑक्टोबर 2010 ही तारीख नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे हे शपथपत्र अवैध असल्याचा मुद्दा उपस्थित केला, तसेच फडणवीस यांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरवून ते स्वीकारू नये, अशी मागणी करण्यात आली.

याबाबत व्यवसाय प्रमाणपत्राला 29 डिसेंबर 2018 पासून पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे हे दिसून आले. अर्जासोबत नमुना 26 मधील प्रतिज्ञापत्र दाखल करणे आवश्यक आहे जे देवेंद्र फडणवीस यांनी सादर केले आहे, तसेच संबंधित नोटरीचीही मुदतवाढ करण्यात आली आहे. याबाबत खात्री झाल्याने हरकतीत तथ्य नसल्याचे निवडणूक अधिकार्‍यांनी म्हटले आहे. आम आदमी पार्टीचे उमेदवार अमोल हाडके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री झाल्यापासून मुंबईतील मलबार हिल येथे वर्षा बंगला आणि नागपूर येथे रामगिरी बंगला होता. या दोन्ही शासकीय निवासस्थानाबाबत थकबाकी नसल्याची माहिती नमुना 26 मध्ये नसल्याने प्रथमदर्शनी ते अपूर्ण आहे असं सांगत ते स्वीकारू नये, अशी मागणी केली होती, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम प्राधिकारी यांच्याकडे ना-देय प्रमाणपत्र स्वतंत्ररीत्या दाखल केली आहेत. त्याबाबत माझी खात्री झाली आहे. त्यामुळेच हाडके यांनी दाखल केलेली हरकत मी फेटाळतो आहे, असेही निवडणूक अधिकार्‍याने म्हटले आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply