Breaking News

लॉकडाऊनमध्ये 60 हजारांवर गुन्हे

पनवेल : कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून राज्यात 21 एप्रिलपर्यंत 60 हजार 5 जणांवर गुन्हे दाखल झाले असून, 2 कोटी 30 लाख 20 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या काळात 121 पोलिसांवर हल्ला केल्याने 411 जणांना अटक करण्यात आली आहे. यात रायगड जिल्ह्यातील दोन घटनांचा समावेश असून, तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईत एक घटना घडली अनधिकृत प्रवासी वाहतूकप्रकरणी 1 हजार 62 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर रस्त्यावर वाहने आणल्याबद्दल 41 हजार 768 वाहने जप्त करण्यात आली आहेत. कायदा मोडल्याने कलम 188खाली झालेल्या कारवाईत रायगडातील 143 आणि नवी मुंबईतील 506 जणांचा समावेश आहे. 

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply