मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. यामुळे हातावर पोट असणारे व्यक्ती, मजूर, आदिवासी बांधव यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत त्यांना मायेचा घास मिळावा व संकटसमयी कोणीही उपाशी राहू नये या हेतूने अजय टाटनवा यांनी स्वखर्चाने त्यांना जेवण दिले आहे. अजय टाटनवा यांनी सांगितले की, दररोज 200 ते 500 नागरिकांना जेवण देण्याचे काम केले जाते. यामध्ये मालवणी मालाड, अंधेरी, वरळी या ठिकाणी असणार्या गरजूंना दररोज पोटभर जेवण दिले जाते.