Breaking News

लॉकडाऊनकाळात गरजूंना जेवण

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. यामुळे हातावर पोट असणारे व्यक्ती, मजूर, आदिवासी बांधव यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत त्यांना मायेचा घास मिळावा व संकटसमयी कोणीही उपाशी राहू नये या हेतूने अजय टाटनवा यांनी स्वखर्चाने त्यांना जेवण दिले आहे. अजय टाटनवा यांनी सांगितले की, दररोज 200 ते 500 नागरिकांना जेवण देण्याचे काम केले जाते. यामध्ये मालवणी मालाड, अंधेरी, वरळी या ठिकाणी असणार्‍या गरजूंना दररोज पोटभर जेवण दिले जाते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply