पेण ः प्रतिनिधीपेण रामवाडी ब्रिजजवळ रेल्वे अपघातात तीन जण ठार झाल्याने खळबळ उडाली आहे. पेण चिंचपाडा येथील सुशील वर्मा (24), सुनील वर्मा (25) व निखिल गुप्ता (25) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हे युवक शनिवारी रात्रीच्या सुमारास रामवाडी रेल्वे ब्रिजच्या पुढे वडखळ बाजूकडे स्टोन क्र. 104/2जवळ बसले असताना मालगाडीने त्यांना उडविले. अपघाताची माहिती मिळताच पेण उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव यांच्यासह पेण पोलीस निरीक्षक जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी सपोनि. महेश कदम अधिक तपास करीत आहेत.
Check Also
पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …
RamPrahar – The Panvel Daily Paper