Breaking News

रेल्वे अपघातात तिघांचा मृत्यू

पेण ः प्रतिनिधीपेण रामवाडी ब्रिजजवळ रेल्वे अपघातात तीन जण ठार झाल्याने खळबळ उडाली आहे. पेण चिंचपाडा येथील सुशील वर्मा (24), सुनील वर्मा (25) व निखिल गुप्ता (25) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हे युवक शनिवारी रात्रीच्या सुमारास रामवाडी रेल्वे ब्रिजच्या पुढे वडखळ बाजूकडे स्टोन क्र. 104/2जवळ बसले असताना मालगाडीने त्यांना उडविले. अपघाताची माहिती मिळताच पेण उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव यांच्यासह पेण पोलीस निरीक्षक जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी सपोनि. महेश कदम अधिक तपास करीत आहेत.

Check Also

महाराष्ट्रात प्रथमच ‌‘स्मार्ट पे किऑस्क‌’द्वारे मालमत्ता कर भरण्याची सुविधा

पनवेल महापालिकेचा पुढाकार; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तनागरिकाभिमुख डिजिटल सेवांच्या …

Leave a Reply