जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात यावल-चोपडा रस्त्यावर किनगावजवळील मनूदेवी मंदिराच्या परिसरात एक टेम्पो उलटून 15 मजुरांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी (दि. 15) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पपई भरलेला आयशर टेम्पो रावेरकडे निघाला होता. मध्यरात्री 1च्या सुमारास रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा टेम्पो उलटला. या अपघातात 16 मजुरांचा मृत्यू झाला आहे. सर्व मजूर हे झोपलेले होते. त्यामुळे काही कळण्याच्या आता काळाने त्यांच्यावर झडप घातली. मृतांमध्ये आभोडा, केर्हाळा आणि रावेर येथील मजुरांचा समावेश आहे, तर पाच जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …