Breaking News

प्रकाश आंबेडकरांचाही ‘दिबां’च्या नावाला पाठिंबा

मुंबई ः प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, ही मागणी स्थानिक स्तरावर जोर धरू लागली आहे. त्यात आता रिपाइं (आठवले गट)पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही या विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्यायला हवे, अशी मागणी करीत आपला पाठिंबा दर्शविला आहे.
या संदर्भात प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नवी मुंबईच्या इतिहासात दि. बा. पाटील यांचे बहुमोल असे योगदान राहिले आहे. नवी मुंबईसाठी ज्या भूमिपुत्रांनी जमीन दिली, त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी जो लढा झाला, त्याचे नेतृत्व ‘दिबां’नी केले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातही ‘दिबां’चे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ओबीसींच्या जागृती व हक्कांसाठी संघटित झालेल्या चळवळीचे ते लढाऊ नेते होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमिपुत्रांची ‘दिबां’चे नाव विमानतळाला देण्याची मागणी रास्त व न्याय्य आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply