Breaking News

पाली पुलावरील वाहतूक ठप्प; सुधागडात सतर्कतेचा इशारा

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यात मुसळधार पावसाने सलग दोन दिवस हाहाकार उडविला आहे. तालुक्यातील  नद्या, नाले, रहदारीचे रस्ते, पाण्याने तुडुंब भरले आहेत. जनजिवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी रात्रीपासून रविवार व सोमवारी पावसाचा जोर कायम राहिल्याने पाली, जांभुळपाड्यासह सुधागड तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले. आंबा नदीवरील पाली येथील पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती, यात प्रवासी, रुग्ण, नोकरदारांचे हाल झाले. पाली-खोपोली मार्गावरील पाली व जांभुळपाडा तसेच तामसोली पूल व गावाला नदीच्या पाण्याने वेढा घातला आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला. सोमवारी पावसाचा जोर वाढल्याने आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. तसेच तालुक्यातील पाली, पेडली व परळी बाजारपेठेत ग्राहकांची संख्या रोडावल्याचे दिसून आले. शेतीच्या कामांनादेखील खीळ बसला आहे. पाली बसस्थानक परिसरात पाणी साचले होते.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply