Breaking News

पाली पुलावरील वाहतूक ठप्प; सुधागडात सतर्कतेचा इशारा

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यात मुसळधार पावसाने सलग दोन दिवस हाहाकार उडविला आहे. तालुक्यातील  नद्या, नाले, रहदारीचे रस्ते, पाण्याने तुडुंब भरले आहेत. जनजिवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी रात्रीपासून रविवार व सोमवारी पावसाचा जोर कायम राहिल्याने पाली, जांभुळपाड्यासह सुधागड तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले. आंबा नदीवरील पाली येथील पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती, यात प्रवासी, रुग्ण, नोकरदारांचे हाल झाले. पाली-खोपोली मार्गावरील पाली व जांभुळपाडा तसेच तामसोली पूल व गावाला नदीच्या पाण्याने वेढा घातला आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला. सोमवारी पावसाचा जोर वाढल्याने आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. तसेच तालुक्यातील पाली, पेडली व परळी बाजारपेठेत ग्राहकांची संख्या रोडावल्याचे दिसून आले. शेतीच्या कामांनादेखील खीळ बसला आहे. पाली बसस्थानक परिसरात पाणी साचले होते.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply