पनवेल : कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून राज्यात 21 एप्रिलपर्यंत 60 हजार 5 जणांवर गुन्हे दाखल झाले असून, 2 कोटी 30 लाख 20 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या काळात 121 पोलिसांवर हल्ला केल्याने 411 जणांना अटक करण्यात आली आहे. यात रायगड जिल्ह्यातील दोन घटनांचा समावेश असून, तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईत एक घटना घडली अनधिकृत प्रवासी वाहतूकप्रकरणी 1 हजार 62 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर रस्त्यावर वाहने आणल्याबद्दल 41 हजार 768 वाहने जप्त करण्यात आली आहेत. कायदा मोडल्याने कलम 188खाली झालेल्या कारवाईत रायगडातील 143 आणि नवी मुंबईतील 506 जणांचा समावेश आहे.
Check Also
पनवेल भाजपतर्फे घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा
२५ हजारांपर्यंतची आकर्षक पारितोषिके पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर …
RamPrahar – The Panvel Daily Paper