कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे पाऊल
रेवदंडा : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून रेवदंडा ग्रामपंचायत आणि रेवदंडा-चौल व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून तीन दिवसासाठी रेवदंडा बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदला नागरिकांनी प्रतिसाद दिला.
रेवदंडा हे अलिबाग, रोहा व मुरूड तालुक्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. शिवाय परिसरातील गावांत कोरोना रुग्ण आढळल्याने रेवदंडा ग्रामस्थांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी बाजारपेठ 4, 5 व 6 असे तीन दिवस बंद ठेवण्यात आली आहे. बंदमुळे शुकशुकाट दिसून येत आहे
RamPrahar – The Panvel Daily Paper