
मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाईं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फं आप्पा बारणे यांच्या प्रचाराने रसायनी -पाताळगंगा परीसर ढवळून निघाला असून परीसरातील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा विजयी करुन दिल्लीत पाठविण्यासाठी व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी रसायनी व आसपासच्या परिसरातून बारणे यांना जास्तीतजास्त मतदान कसे होईंल यासाठी पुर्ण ताकद लावणार असल्याचे प्रतिपादन विभागप्रमुख अजित सावंत यांनी केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper