Breaking News

पांगळोली येथे गोठ्याला आग, चार जनावरे होरपळली, एकाचा मृत्यू

पोलादपूर : प्रतिनिधी

तालुक्यातील पांगळोली गावातील भूमिहीन शेतकर्‍याच्या गोठ्याला बुधवारी (दि. 4) दुपारनंतर अचानक आग लागून चार गुरे होरपळली. त्यापैकी एका बैलाचा मृत्यू झाला. पोलादपूर तहसीलदार दिप्ती देसाई यांच्या आदेशानुसार तातडीने पंचनामा करण्यात आला आहे.

पोलादपूर तालुक्यातील पांगळोली येथील लोकांची शेतजमिन तोंडी भाड्याने घेऊन कसणारे परशुराम दाजी उपाळे यांच्या कुटूंबियांची केवळ म्हशी, गायी या चार-पाच पाळीव जनावरांवरच उपजीविका अवलंबून होती. बुधवारी दुपारी 4 वाजल्यानंतर या गुरांच्या गोठ्यास अचानक आग लागली. या दुर्घटनेत ही जनावरे होरपळून गंभीर जखमी झाली आहेत. यापैकी एका बैलाचा मृत्यू  झाला आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply