अलिबाग ः प्रतिनिधी
अलिबाग शहरातील महावीर चौक येथील बंद असलेली वाहतुक सिग्नल यंत्रणा दोन वर्षांनी गुरुवारी (दि. 29) पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला आळा बसणार आहे. शहरातील वाढणारी वाहनांची संख्या आणि बेशिस्त वाहनचालक यांना लक्षात घेऊन महावीर चौक आणि अशोका सेंटर परिसरात सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली. नगरपालिकेने जवळपास 20 लाख रुपयांचा निधी यासाठी खर्च केला. तांत्रिक तपासणीनंतर या दोन्ही सिग्नल यंत्रणात वाहतूक पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आल्या. यानंतर वाहतुकीचे नियमन योग्य प्रकारे होईल आणि बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लागेल, अशी अपेक्षा होती. महावीर चौकातील काही महिने वापरल्यानंतर जवळपास दोन वर्ष बंद होती. गुरुवारी सकाळी ही सिग्नल यंत्रणा पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आली. या सिग्नल व्यवस्थेमुळे शहरातील वाहतुकीचे नियमन होण्यास मदत होईल आणि बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लागण्यास मदत होईल.
RamPrahar – The Panvel Daily Paper