माणगाव ः प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळील तिलोरे गावच्या हद्दीत भरधाव कंटेनरची धडक बसून दुचाकीस्वार दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. 15) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातातील फिर्यादी राजेंद्र गंगाराम राइका हे त्यांच्या ताब्यातील कार चालवित असताना माणगावकडून येणार्या एका कंटेनरच्या (एमएच 46-बीएम 0676) चालकाने माणगाव बाजूकडे जाणार्या मोटरसायकलला (एमएच-02 इजी 1385) आपल्या वाहनाची धडक दिली. या अपघातात मोटरसायकलवरील विशाल संजय सकपाळ (वय 34, रा. दिवा, जि. ठाणे) व राजेश राजाराम धामणकर (वय 30, रा. खार, मुंबई) या दोन तरुणांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात येऊन कंटेनरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Check Also
झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!
‘पुरवैय्या’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …
RamPrahar – The Panvel Daily Paper