Breaking News

उद्धर येथे तीन घरे जमीनदोस्त

पाली : प्रतिनिधी

मुसळधार पाऊस व वादळी वार्‍यात उद्धर आदिवासी वाडीतील नवशा वाघमारे, संजय नारायण वाघमारे आणि भागूनाथ जाधव यांची तीन घरे जमीनदोस्त झाली आहेत. सुदैवाने या आपत्तीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. घरातील जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे भिजून मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून त्वरित पंचनामा होऊन या कुटुंबांना तातडीची मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply