अलिबाग : जिमाका
जिल्ह्यात झालेल्या अतिपर्जन्यवृष्टीमुळे व पुलावरून येणार्या-जाणार्या अतिअवजड वाहतुकीमुळे पूल क्षतीग्रस्त झाल्यास होणारी कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने, तसेच जांभूळपाडा व बागूलपाडा पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे वाकण-पाली-खोपोली रस्त्यावरील 20 मे. टनापर्यंतची अवजड वाहतूक सुरू ठेवून त्यावरील सर्व प्रकारची अतिअवजड वाहतूक बंद करण्यात येत आहे.
सहा महिन्यांकरिता ही वाहतूक मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून वाकण-पेण-खोपोलीमार्गे वळविण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत.