मुंबई : प्रतिनिधी
भारताचे माजी तडाखेबंद फलंदाज संदीप पाटील यांनी कसोटीच्या नव्या चारदिवसीय संकल्पनेला विरोध केला आहे. जेव्हा त्यांना या संकल्पनेविषयी मतप्रदर्शन करण्यास सांगितले तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया होती ’हा मूर्खपणा आहे.’
यावर सविस्तर बोलताना पाटील म्हणाले की, सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटची जी समर्पक व्याख्या केली आहे, तेच माझेही म्हणणे आहे. मी जुन्या जमान्यातील क्रिकेटपटू आहे. कसोटीतील पहिला दिवस हा वेगवान गोलंदाजांचा असतो आणि कसोटी क्रिकेट यातच त्या क्रिकेट प्रकाराचे वैशिष्ट्य सामावले आहे. ती विशेषता या कसोटीला चार दिवसांवर आणून आपण घालवून टाकणार आहोत का?
याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, इंग्लंडचे माजी गोलंदाज इयन बोथम, श्रीलंकेचा माजी फलंदाज महेला जयवर्धने यांनीही चार दिवसांच्या कसोटी क्रिकेटला विरोध दर्शविला आहे.
Check Also
वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!
वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …
RamPrahar – The Panvel Daily Paper