नवी दिल्ली, मुंबई : गेल्या 24 तासांत देशातील 227 कोरोनाग्रस्त रुग्णांची प्रकरणे समोर आली आहेत. देशात मंगळवारी (दि. 31) दुपारी 4 वाजेपर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1251वर पोहोचली होती. यापैकी 101 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर एक रुग्ण स्थलांतरील आहे. सध्या 1117 रुग्णांवर उपचार सुरू असून ते वैद्यकीय तपासणीखाली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवाडीनुसार आतापर्यंत देशात कोरोनामुळे 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात मंगळवारी आढळलेल्या रुग्णांचा एकूण आकडा 77 झाला आहे. दिवसभरात एकट्या मुंबईत 59 कोरोनाग्रस्त आढळले. त्यामुळे राज्यातील रुग्णांच्या एकूण संख्येने तीनशेचा टप्पा पार केला आहे.
Check Also
थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
पनवेल : रामप्रहर वृत्तथोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांनी आपले संपूर्ण आयुष्य बहुजन हिताय, बहुजन …
RamPrahar – The Panvel Daily Paper