कळंबोली : प्रतिनिधी – कोरोना आजाराचा संसर्ग होऊ नये याकरिता केंद्र व राज्य शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्यांचे हाताला काम नसल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे, त्यांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पनवेलमधील अशा कष्टकरी, कामगार, अल्प उत्पन्न गटातील कुटूंबियांना नवी मुंबईतील पोस्ट संघटनानी अन्नधान्याचे वाटप केले. नॅशनल युनियन ऑफ पोस्ट कामगार संघटनेच्या सीडी व जीडीएस नवी मुंबई विभागातील सर्व विभाग संघटनेच्या वतीने पनवेलमधील 200 झोपडपट्टीतील गरीब गरजूंना 50 हजार रुपयांच्या अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …