Breaking News

पोस्ट कामगार युनियनकडून गरीब, गरजूंना धान्याचे वाटप

कळंबोली : प्रतिनिधी  – कोरोना आजाराचा संसर्ग होऊ नये याकरिता केंद्र व राज्य शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्यांचे हाताला काम नसल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे, त्यांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पनवेलमधील अशा कष्टकरी, कामगार, अल्प उत्पन्न गटातील कुटूंबियांना नवी मुंबईतील पोस्ट संघटनानी अन्नधान्याचे वाटप केले. नॅशनल युनियन ऑफ पोस्ट कामगार संघटनेच्या सीडी व जीडीएस नवी मुंबई विभागातील सर्व विभाग संघटनेच्या वतीने पनवेलमधील 200 झोपडपट्टीतील गरीब गरजूंना 50 हजार रुपयांच्या अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply