Breaking News

सुरक्षा रक्षकांना अन्नधान्याचे वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने देशभर जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे तळोजा औद्योगिक क्षेत्रातील संकटात सापडलेल्या सुरक्षा रक्षकांना साई सुरक्षा रक्षक एजन्सीने मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांना दिलासा मिळाला आहे.लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या कंपनीमध्ये अडकून पडलेल्या सुरक्षा रक्षकांना साई सुरक्षा रक्षक एजन्सीचे प्रमुख राजेंद्र पाटील यांनी जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करून सुरक्षा रक्षकांना दिलासा दिला. याबद्दल सुरक्षा रक्षकांनी पाटील यांचे आभार मानले.

Check Also

नैना क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हरकतींवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्या

प्रधान सचिव लोकेश चंद्रा यांचे आदेश; प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास गती मुंबई : रामप्रहर वृत्तनवी …

Leave a Reply