Breaking News

सुरक्षा रक्षकांना अन्नधान्याचे वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने देशभर जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे तळोजा औद्योगिक क्षेत्रातील संकटात सापडलेल्या सुरक्षा रक्षकांना साई सुरक्षा रक्षक एजन्सीने मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांना दिलासा मिळाला आहे.लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या कंपनीमध्ये अडकून पडलेल्या सुरक्षा रक्षकांना साई सुरक्षा रक्षक एजन्सीचे प्रमुख राजेंद्र पाटील यांनी जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करून सुरक्षा रक्षकांना दिलासा दिला. याबद्दल सुरक्षा रक्षकांनी पाटील यांचे आभार मानले.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply