Breaking News

कोरोना काळात कर्तव्य बजावणार्‍या पत्रकारांना 50 लाखांचे विमा कवच

मुंबई ः प्रतिनिधी
सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कोरोनाविरोधात दिवसरात्र लढा देत आहेत. प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रांचाही अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे. कोरोना काळात माहिती मिळवण्यासाठी पत्रकारही अपार मेहनत करीत आहेत, तर दुसरीकडे आपले कर्तव्य बजावताना काही पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान, कोरोना काळात कर्तव्य बजावणार्‍या पत्रकारांना 50 लाखांचे विमा कवच देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली.
केवळ डॉक्टर आणि पोलीसच नाही, तर पत्रकारही कोरोना काळात कर्तव्य बजावत आहेत. दुर्दैवाने जर कोणी कर्तव्य बजावताना बाधित झाले, तर घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही बरे व्हालच. दुर्दैवाने कर्तव्य बजावताना एखाद्या पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर त्यालाही 50 लाखांचे विमा कवच असणार आहे. ते केवळ शासकीय कर्मचार्‍यांपुरते मर्यादित नाही, असे टोपे यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकार्‍यांनी शहानिशा केल्यानंतर कर्तव्य बजाताना कोरोनाची लागण होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्यास हे कवच मिळणार आहे. तसेच कोरोनाचे काम करणार्‍या कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आणि त्याच्यावर हा प्रसंग ओढवला तर जिल्हाधिकार्‍यांनी लिहून दिल्यावर त्यांना 50 लाखांचे विमा कवच मिळणार आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply