Breaking News

छात्रभारतीकडून गरजूंना अन्नधान्याचे वाटप

मोहोपाडा ः प्रतिनिधी

कोरोनाच्या संसर्गामुळे जगभरात आलेल्या महामारीमुळे मजुरांचे व गरीब कुटुंबीयांचे हाल होत आहेत. लॉकडाऊन काळात आर्थिक आवकच बंद झाल्याने उदरनिर्वाह कसा करायचा याची चिंता त्यांना सतावत होती. या वेळी छात्रभारतीने पहिल्या टप्प्यापासून पाचव्या टप्प्यापर्यंत रसायनी, खालापूर, पनवेल तालुक्यातील गोरगरिबांना धान्यासह किराणा सामान वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. आतापर्यंत मोहोपाडा, नवीन पोसरी, रिस, शिवनगर, आली आंबिवली, पळस्पे, सुकापूर, विणेगाव, माजगाव, तुराडे, नढाळ वाडी, वावेघर येथे गरजू कुटुंबीयांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. छात्रभारतीचे अनेक कार्यकर्ते कोरोनाच्या संकटकाळात जीवनावश्यक  वस्तू वाटपाचे काम करीत आहेत.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply