Breaking News

करंजा-रेवस तरसेवा पुन्हा होणार सुरू

आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांना यश

उरण : वार्ताहर
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 22 मार्चपासून राज्यात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून करंजा-रेवस ही प्रवासी जलवाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. ही सेवा पूर्ववत करण्याबाबत उरणचे आमदार महेश बालदी यांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबईचे मुख्य बंदर अधिकारी कॅ. संजय शर्मा व रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे प्रयत्न केले. त्यास यश येऊन येत्या दोन ते तीन दिवसांत करंजा-रेवस तरसेवा पुन्हा सुरू होणार आहे.
अलिबाग येथे जाण्यासाठी करंजा येथून रेवस या जलमार्गाने  नागरिक प्रवास करीत असतात, परंतु कोरोना व लॉकडाऊनमुळे हा जलप्रवास बंद करण्यात आल्याने तरसेवाही बंद झाली. परिणामी नागरिकांना रस्ते प्रवास करावा लागत होता. त्यात वेळ जास्त लागायचा व पैसेही जास्त मोजावे लागत असत.
 उरणचे आमदार महेश बालदी यांनी करंजा ते रेवस तरसेवा सुरू करण्यात यावी या संदर्भात प्रयत्न केले व त्याला यश आले. दोन ते तीन दिवसांत करंजा ते रेवस ही तरसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे उरण ते अलिबाग व अलिबाग ते उरण अशी ये-जा करणार्‍या नागरिकांची चांगल्या प्रकारे सोय होणार आहे. याबद्दल नागरिकांनी आमदार महेश बालदी यांचे आभार मानले आहेत.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply