अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातून 60 ते 70 गावांना पाणी पुरवठा केला जातो. बुधवारी पाण्याच्या टाकीत मृतदेह असल्याचे कर्मचार्यांच्या लक्षात आले. यामुळे तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ऐन कोरोना संकटाच्या काळात ही घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. ऐन पावसाळ्यात या परिसरातील गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काशीनाथ हंबीर (वय 40) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पाण्याच्या टाकीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. 3 ते 4 दिवसापूर्वी तो व्यक्ती टाकीत पडला असल्याची माहिती आहे.
Check Also
महाराष्ट्रातूनही ५० लाख घुसखोर बांगलादेशी बाद होणार -किरीट सोमय्या
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयगाच्या वतीने विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियान राबविण्यात येत आहे. …
RamPrahar – The Panvel Daily Paper